Advertisement

'राज्यात दोन दिवस दारुबंदी करा'


'राज्यात दोन दिवस दारुबंदी करा'
SHARES

मुंबई - ईद-ए-मिलाद या मुस्लिम सणाच्या निमित्ताने राज्यात दोन दिवस दारू बंदी घोषित करावी अशी मागणी एमआयएम पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. देशभरामध्ये मोहम्मद पैंगबरांचा जन्मदिवस म्हणून ईद-ए-मिलाद साजरा केला जातो. या दिवशी राज्यभरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारनं दोन दिवस दारूबंदी घोषित करावी, असंही वारिस पठाण यांनी पत्रात म्हटलंय. मुंबई आणि आसपासच्या परिसरात जैन समाजासाठी पर्यूषण पर्व सणासाठी मांस विक्रीवर बंदी घालण्यात येते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा