आधी सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबडून घेतली आणि आता ऐन दिवाळीच्या तोंडावर जीएसटीचे दर कमी करून सर्वसामान्यांना भेट दिल्याचा आव केंद्र सरकार आणत आहे. केंद्र सरकारने ही भेट स्वत:हून दिलेली नाही. तर सर्वसामान्यांच्या संतापानं मस्तवाल सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. मोदी सरकारने आता दिवाळीत सर्वसामान्यांना कुठलाही त्रास देऊ नये, हिच त्यांच्याकडून सर्वसामान्यांसाठी भेट ठरेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
शिवसेना भवनात तातडीने बोलवलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी जीएसटी, लोडशेडिंग, फेरीवाले आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)