Advertisement

शेतकरी, कष्टकऱ्यांचा बुलुंद आवाज हरपला, मुख्यमंत्री म्हणाले...

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील (N. D. Patil) यांचे आज सोमवारी निधन झाले.

शेतकरी, कष्टकऱ्यांचा बुलुंद आवाज हरपला, मुख्यमंत्री म्हणाले...
SHARES

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील (N. D. Patil) यांचे आज सोमवारी निधन झाले. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनामुळे शेतकरी, कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. पाटील आघाडीवर होते.

पुढे ते म्हणाले की, सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी ‘ब्र’ काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने ‘एन. डी.’ उभे राहिलेच म्हणून समजा. अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता.

एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्यानं महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

जेष्ठ नेते एन. डी. पाटील यांच निधनाने अतीव दुःख झाल्याची भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून त्यांनी संघर्ष केला. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या लढ्याचा आवाज आज शांत झाला आहे. शेतकरी, कामगारंसह एन. डी पाटील यांचे शिक्षणक्षेत्रातले अमूल्य योगदान देखील मोठे आहे. माझा आणि त्यांचा परिचय हा महाराष्ट्र- बेळगाव सीमावासीयांच्या लढाईत झाला होता. या लढ्यातील जी सुरुवातीची नेत्यांची फळी होती त्यातले एन. डी. पाटील हे एक महत्वाचे नाव होते.



हेही वाचा

मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे

मराठीत पाट्या, 'श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे...'; राज ठाकरेंचा इतर पक्षांना टोला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा