Advertisement

रुईया कॅालेजच्या 'एकादशावतार'ने पटकावला कोकण चषक

कोकण चषक या स्पर्धेत मुंबईच्या रुईया कॉलेजच्या 'एकादशावतार' या नाटकानं बाजी मारत सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट पार्श्र्वसंगीत असे तब्बल ५ पुरस्कार पटकावले.

रुईया कॅालेजच्या 'एकादशावतार'ने पटकावला कोकण चषक
SHARES

कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसंच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत रुईया काॅलेजच्या 'एकादशावतार'ने आपलं नाव कोरलं आहे.


९ टीम सहभागी

स्पर्धेचं यंदाचं हे १३वं वर्ष होतं. यावर्षी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतून ९ टीम स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. रवींद्र नाट्यमंदिर इथं पार पडलेल्या या स्पर्धेचे अंतिम परीक्षक म्हणून अभिनेत्री अनिता दाते, भारती पाटील, अभिनेता अनिल गवस, समीर खांडेकर आणि माधव देवचक्के यांनी काम पहिलं. या स्पर्धेत मुंबईच्या रुईया कॉलेजच्या 'एकादशावतार' या नाटकानं बाजी मारत सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट पार्श्र्वसंगीत असे तब्बल ५ पुरस्कार पटकावले.


विभागवार पारितोषिक

'रेनबोवाला', 'तुरटी' या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. 'फायनडींग खड्डा' हि एकांकिका निवडली उत्तेजनार्थ म्हणून निवडण्यात आली. यात सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष - प्रथम पारितोषिक - श्रीनाथ म्हात्रे (एकादशावतार), द्वितीय पारितोषिक - शिवराम गावडे (बेफोर द लाइन ), तृतीय पारितोषिक - ओंकार राऊत (बेनिफिट ऑल डाऊट ), सर्वोतकृष्ट अभिनय स्री - प्रथम पारितोषिक - सायली बीडकर (रेनबोवला ), द्वितीय पारितोषिक - कोमल वंजारे (तुरटी ), तृतीय पारितोषिक - मनाली राजश्री (बेफोर द लाइन), सर्वोत्कृष्ट लेखन - मोहन बनसोडे (चौकट)यांचा समावेश आहे.


कलागुणांना वाव

महाराष्ट्राच्या विविध भागापुरते मर्यादित असलेले कलागुणी अशा एकांकिका स्पर्धांमुळे सर्वासमोर येत असल्याने अशा स्पर्धांना प्रोत्साहन देऊन पुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत गवस यांनी व्यक्त केलं.


तर, अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे भावी काळात मराठी रंगभूभी, मालिका, चित्रपट यामध्ये नवनवीन चेहेरे पाहायला मिळतील. आम्हालाही त्यांच्या सोबत काम करायची संधी मिळेल, असं मत भारती पाटील यांनी व्यक्त केलं.

ही एकांकिका स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. प्रदीप ढवळ, प्रा. मंदार टिल्लू, बाप्पा राऊत, हर्षला लिखिते यांनी मेहनत विशेष घेतली होती. ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.



हेही वाचा-

'या' मराठी चित्रपटात दिसणार दलिप ताहिल

दोन भागांमध्ये भेटणार मराठी साहित्यातील 'भाई'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा