वरळी - वरळी विभागात असणा-या दक्षिण भारतीय देवस्थानांपैकी एक म्हणजे मरीअम्मा देवी मंदीर. मरीअम्मा मंदीर ट्रस्ट यांच्याशी सलग्न असलेल्या एन्जॉय फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने गेली 30 वर्षे गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. हा विभाग म्हणजे गोपाळ नगर झोपडपट्टीचा विभाग. 2010 ते 2014 सालादरम्यान या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन करण्यात आले. परंतु असे असताना देखील गणेशोत्सवाला एन्जॉय फ्रेंड्स ग्रुपने कधीही खंड पडू दिला नाही. या मंडळात 80 टक्के लोक दक्षिण भारतीय आहेत. परंतु आजपर्यंत मुंबईत हा सण आम्ही अगदी गुण्यागोविंदाने साजरा करत असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे कार्यकर्ते रवी पंजाला यांनी दिलीय.