Advertisement

अशोकमामांचा तातोबा साकारणार हा कलाकार

एखाद्या गाजलेल्या नाटकातील व्यक्तिरेखा पुन्हा नव्या रूपात सजीव करण्याची संधी फार कमी कलाकारांना लाभते. आता अशोक सराफ यांनी आपल्या अनोख्या शैलीत अजरामर केलेली तातोबा ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी विघ्नेश जोशींना लाभली आहे.

अशोकमामांचा तातोबा साकारणार हा कलाकार
SHARES

एखाद्या गाजलेल्या नाटकातील व्यक्तिरेखा पुन्हा नव्या रूपात सजीव करण्याची संधी फार कमी कलाकारांना लाभते. आता अशोक सराफ यांनी आपल्या अनोख्या शैलीत अजरामर केलेली तातोबा ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी विघ्नेश जोशींना लाभली आहे.

मागील काही वर्षांपासून रंगभूमीवर गाजलेली जुनी नाटकं नवं रूप लेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत. या यादीत आता ‘हिमालयाची सावली’ या गाजलेल्या नाटकाचं नावही सामील झालं आहे. मराठी सिनेसृष्टीत अशोकमामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक सराफ यांनी या नाटकात साकारलेली तातोबा काशीकर ही व्यक्तिरेखा त्या काळी प्रचंड गाजली होती. त्यामुळं अशोकमामां सारख्या मात्तबर कलाकारानं साकारलेली भूमिका करणं हे कोणत्याही कलाकारासाठी अभिमानाची गोष्ट असली तरी ती तितकीच जबाबदारीची असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. १९७२ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘हिमालयाची सावली’ या नाटकातील अशोकमामांच्या अभिनयानं सजलेली तातोबा काशीकर ही व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य अभिनेता विघ्नेश जोशी यांना लाभलं आहे.

‘हिमालयाची सावली’ या नाटकात ही भूमिका नव्या संचात साकारणारे विघ्नेश आपल्या अनुभवाबाबत म्हणाले की, मोठ्या कार्यासाठी अपमान सहन करून पाठीशी राहणाऱ्या मेव्हण्याचं हे नाटक आहे. देवरुखच्या मातीतलं हे अस्सल ब्राह्मणी व्यक्तिमत्व मिश्कील स्वभावाचं असलं तरी तितकचं बेरकी आहे. व्यक्तिमत्वाचा स्वभाव मिश्कील असला तरी ‘त वरून ताकभात’ ओळखणाऱ्या या तातोबाचा एक स्वत:चा असा एक वेगळा अंदाज आहे. तो पाहण्यातच एक वेगळी मजा असल्याचंही विघ्नेश म्हणाले.

या भूमिकेसाठी कोकणातील बोलीभाषेचा लहेजा जाणून घेणं गरजेच होतं. दिग्दर्शक राजेश देशपांडे कोकणातील असल्यानं त्यांना ही भाषा चांगलीच अवगत आहे. त्यांनी ही भाषा विघ्नेश यांना उत्तमरीत्या शिकवली. प्रा.वसंत कानेटकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये ‘हिमालयाची सावली’ नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. या नाटकात शरद पोंक्षे, शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, कपिल रेडेकर, ओमकार कर्वे, कृष्णा राजशेखर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, रुतुजा चीपडे, पंकज खामकर यांच्याही भूमिका आहेत.

प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्रॉडक्शन्स निर्मित व सुप्रिया प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते गोविंद चव्हाण व प्रकाश देसाई आहेत. संगीताची जबाबदारी राहुल रानडे, तर कलादिग्दर्शन संदेश बेंद्रे यांचं असणार आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची असून, रंगभूषा शरद सावंत यांची आहे. निर्मिती सूत्रधार सुभाष रेडेकर आहेत.



हेही वाचा -

अक्षयला आताच का सुचला मेट्रोचा प्रवास?

अमृता मागणार का तिची माफी?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा