Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं 'शिवशाही'चा प्रवास ठरतोय असुरक्षित?

मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. मागील ३ महिन्यांहून अधिक दिवस एसटीचे कर्मचारी संपावर आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं 'शिवशाही'चा प्रवास ठरतोय असुरक्षित?
SHARES

मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. मागील ३ महिन्यांहून अधिक दिवस एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळं प्रवाशांना खासगी शिवशाही आणि खासगी बस वाहतुकीनं प्रवास करावा लागत आहे. मात्र, हा प्रवास असुरक्षित असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवशाहीवरील चालकांना १६ ते १८ तासांची ड्युटी करावी लागत आहे. मुंबई ते पुणे, सातारा, कोल्हापूर या मार्गावर गाड्या बहुतांश वेळा रात्रीच्या वेळेत धावतात. यामुळे खासगी शिवशाहीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

खासगी बस गाड्यामध्ये लांब पल्ल्याच्या अंतरासाठी दोन चालक असतात. दोन चालक असल्याने त्यांना पुरेसा आराम मिळतो. खासगी गाडीमध्ये चालकांना आराम करण्यासाठी आसनावर व्यवस्था केलेली असते. मात्र एसटीच्या शिवशाहीमध्ये केवळ एकच चालक आहे. खासगी शिवशाही चालकांना आराम करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.

रात्रीच्यावेळी सर्वच गाड्या 'अप्पर लाइट' म्हणजेच चालकाच्या डोळ्यावर प्रकाश पडेल अशा पद्धतीने दिवे चालू ठेवून गाड्या चालवतात. दिवसाच्या तुलनेत रात्री बस चालवताना डोळ्यांना अधिक त्रास होतो. सध्या संपामुळे साध्या गाड्या उपलब्ध नाहीत. यामुळे आम्हाला डबल ड्युटी करण्याच्या सूचना आहे. मात्र पगार केवळ १८ हजार दिला जातो.

साधारण सकाळी ९-१० वाजता ड्युटी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार-पाच वाजता पूर्ण होते. संपामुळे महामंडळाचे विश्रामगृहही बंद असल्याने गाडीतच आराम करावा लागतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा गाडीची वेळ झाल्यावर फेरी सुरू होते, अशी माहिती शिवशाहीवरील खासगी चालकाने दिली.

या संपामुळे मोठ्या प्रमाणात एसटी वाहतूक बाधित झालेली आहे. आता पर्यंत ६८५४ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले असून ११०२४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे. या कर्मचाऱ्यापैकी ८०६७ जणांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यातील २४३ आगारातून सरासरी ३५ फेऱ्या सुरू आहेत, अशी माहिती महामंडळाने दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा