Advertisement

मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले, जीवितहानी नाही!


मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले, जीवितहानी नाही!
SHARES

नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह 6 डबे आसनगाव-वासिंद या रेल्वे स्थानकांदरम्यान घसरले. मंगळवारी पहाटे 6 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून डबे हटवण्याचे काम सुरू करण्यासाठी कल्याणहून कर्मचारी रवाना करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रवासी साखर झोपेत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि सगळेजण बर्थवरून खाली पडले. जेव्हा प्रवासी बाहेर आले तेव्हा त्यांना इंजिन आणि त्याला लागून असलेले काही डबे रेल्वे रूळावरुन घसरलेले दिसले. रेल्वे रुळ पूर्णपणे तुटलेले होते आणि वीजपुरवठा करणारी 'ओव्हरहेड वायर' देखील तुटली होती. जवळपास 2 तास उलटून गेल्यानंतरही इथल्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून मदत मिळाली नव्हती, असे या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले आहे.


आसनगांव भागात तुफान पाऊस सुरू असून या प्रवाशांना पावसात भिजत मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. मात्र काही लोक किरकोळ जखमी झाल्याचे कळते आहे. स्थानिक आणि रेल्वे पोलिस मदत करत आहेत.

सततच्या पावसामुळे रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने हा अपघात घडल्याचे कळते. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार जिथे ही दुर्घटना घडली, तिथे रूळावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती आली होती. या मार्गावर धुके देखील बरेच होते. ट्रेनच्या चालकाला धुके आणि पावसामुळे रुळावर आलेले दगड दिसले नसावेत आणि म्हणून हा अपघात झाला असावा, असे देखील सांगण्यात येत आहे.

कसारा ते आसनगांव दरम्यानचा मार्ग हा दुपदरी असल्याने मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी संध्याकाळ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा - 

दोन दिवसांत रेल्वे अपघातात ३० मृत्यू

आठवड्याभरात रेल्वे अपघातात ५६ मृत्यू, ७६ जखमी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा