Advertisement

संपामुळं एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा

राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे.

संपामुळं एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा
SHARES

राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. त्यामुळं एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. रविवारी ११९ आगार बंद असल्यानं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आतापर्यंत एसटी महामंडळाचे ५५ कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळं राज्यभरातील २५० आगारांपैकी ११९ हून अधिक आगारांतील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे दिवाळीसाठी गावी गेलेल्या प्रवाशांना या संपाचा मोठा फटका बसला आहे.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संपापूर्वी राज्यातील एसटी प्रवाशांची संख्या २७ लाख होती. यामध्ये घट होऊन ती २० लाखांहून कमी झाली आहे. विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने दोन दिवस उपोषण करण्यात आले होते.

मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आला होता. मात्र न्यायालयाने मनाई केल्यानंतरही विलीनीकरणच्या मुद्द्यावरून अद्यापही ११९ आगारांमध्ये संप सुरूच आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत ८ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सकाळी १० वाजता सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सरकारकडून समिती स्थापन करण्याबाबत राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून असतात. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा