हार्बर मार्गावरील प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत या मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याने हार्बर मार्गावरील एसी लोकल मुख्य मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद होणार आहेत.
14 मेपासून हार्बल मार्गावरील एसी लोकलची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हार्बर रोड एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांना तिकीट खिडकीवर तिकिटाचे उर्वरित दिवसांचे पैसे परत केले जातील.
१ मे ते ८ मे या काळात मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वेमधून रोज सरासरी एकूण २८,१४१ प्रवाशांनी प्रवास केला. यापैकी मुख्य मार्गावर २४,८४२ आणि हार्बर मार्गावर ३,२९९ प्रवासी होते. तिकीट दर कमी केल्यानंतर मुख्य मार्गावरील प्रवासी संख्येत जवळपास ६० टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे मुख्य मार्गावर फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हार्बर मार्गाच्या तुलनेत मुख्य मार्गावर अंतर कमी असल्याने साधारणपणे १० ते १२ फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न आहे. या फेऱ्या या अतिरिक्त म्हणून चालवण्यात येतील. मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढवल्याने रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही एसी लोकल चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सीएसएमटी ते पनवेल, गोरेगावदरम्यानच्या ३२ वातानुकूलित लोकल फेऱ्यांपैकी १६ फेऱ्या बंद करून त्याऐवजी सामान्य फेऱ्या चालवण्यास सुरुवात केली. मे अखेर किंवा जूनमध्ये नवीन वातानुकूलित गाड्या येणार आहेत. त्यानंतर हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी सावध भूमिका रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
रेल्वे प्रशासनाने ५ मेपासून एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात केल्यानंतर मध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा या प्रवाशांच्या प्रतिक्रिया तीव्र झाल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार ही एससी लोकोमोटिव्ह आता रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा