Advertisement

वरळी-शिवडी जोडरस्त्यासाठी वाहतुकीचं योग्य व्यवस्थापन करा- आदित्य ठाकरे

वरळी-शिवडी जोडरस्ता दर्जेदार पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

वरळी-शिवडी जोडरस्त्यासाठी वाहतुकीचं योग्य व्यवस्थापन करा- आदित्य ठाकरे
SHARES

मुंबईतील प्रवास वेगवान व्हावा, वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी शासनाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. वरळी शिवडी जोडरस्ता हा त्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. वरळी आणि शिवडी या दोन्ही बाजूकडे होणारी वाहतूक वरळीच्या जे के कपूर चौकाजवळून होणार असल्याने येथे अतिशय चांगल्या दर्जाचे वाहतूक व्यवस्थापन करावे, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

वरळी-शिवडी जोडरस्ता दर्जेदार पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी वरळीच्या जे के कपूर चौकात भेट दिली तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, महानगरपालिकेचे उपायुक्त तळकर, सहायक आयुक्त शरद उघडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - राज्याला ड्रायव्हर नको, जनतेचं हित बघणारा मुख्यमंत्री हवाय- नारायण राणे

याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी कलानगर जंक्शन भागाला भेट देऊन येथील कामे मार्गी लावावीत तसेच येथील पादचारी पुलाची दुरुस्ती करावी, अशा सूचना केल्या. या परिसरातील वाहतूक व्यवस्थापन, सुशोभीकरण व सौंदर्यीकरणाच्या अनुषंगाने विविध पर्यायांवर त्यांनी श्रीनिवास यांच्यासमवेत चर्चा केली.

हेही वाचा - सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा