Advertisement

बेस्ट बसमध्ये गर्दी झाल्यास सगळ्यांना खाली उतरवणार

,सामाजिक अंतर ठेवण्याबाबत वारंवार सांगूनही प्रवासी ऐकत नसल्यास चालक आणि वाहकांना बसचा प्रवास तिथल्या तिथेच खंडित करण्याची सूचना बेस्ट प्रशासनानं दिली आहे.

बेस्ट बसमध्ये गर्दी झाल्यास सगळ्यांना खाली उतरवणार
SHARES

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटी व बेस्ट बसमार्फत सेवा दिली जात आहे. परंतु, अनेक कर्मचारी बसमध्ये चढण्यास व बसण्यास नियमवाली दिली असतानाही गर्दी करतात. त्यामुळं कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. यामुळं आता सामाजिक अंतर ठेवण्याबाबत वारंवार सांगूनही प्रवासी ऐकत नसल्यास चालक आणि वाहकांना सगळ्यांना खाली उतरवण्याची सूचना बेस्ट प्रशासनानं दिली आहे.

जादा फेऱ्या असूनही प्रवाशी बसमध्ये शेजारी बसून, गर्दीत उभे राहून प्रवास करत आहेत. सामाजिक अंतराबाबत वारंवार सूचना देऊनही प्रवाशी ऐकत नसल्यानं प्रशासनानं हे टोकाचं पाऊन उचलायचं ठरविलं आहे. परिस्थिती उद्भवल्यास अतिरिक्त प्रवाशांना सामावून घेण्याकरिता जवळच्या आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पालिका कर्मचारी, बॅंक कर्मचारी, पोलीस इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईअंतर्गतच नव्हे तर उपनगरातील ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, वसई, विरार येथूनही मुंबईसाठी बेस्टच्या विशेष फेऱ्या सुरू आहेत. 

दररोज १,२०० ते १,३०० बस फेऱ्या बेस्ट करत आहे. त्यासाठी सुमारे ३ हजार चालक-वाहक कार्यरत असतात. मात्र इतक्या फेऱ्या चालवूनही प्रवाशी बसमध्ये एकच गर्दी करतात. अनेकदा एका बसमध्ये ७० ते ८० प्रवासी असतात. एका आसनावर एकाच प्रवाशाने बसावं, उभे राहिल्यास किमान हातभर लांब उभं राहावं, अशा सूचना प्रवाशांना वारंवार दिल्या जातात. परंतु, या सूचना धाब्यावर बसविल्या जात आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा