मुंबईहून जयपूरला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानामध्ये कर्मचारी हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास विसरला. त्यामुळे ३० ते ३५ प्रवाशांच्या कान आणि नाकातून रक्त वाहू लागल्याने खळबळ उडाली. स्वीच सुरू न झाल्याने विमानातील हवेचा दाब वाढून शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. त्यामुळे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं.