Advertisement

राज्यात ७०० कोटींहून अधिक वाहतूक नियम उल्लंघन केलेला दंड थकीत

मुंबईतील वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर सुमारे २८० कोटी रुपये म्हणजे सुमारे ४० टक्के रक्कम थकली आहे.

राज्यात ७०० कोटींहून अधिक वाहतूक नियम उल्लंघन केलेला दंड थकीत
SHARES

वाहन चालवताना चालकानं वाहतुकीच्या नियमांचं पालन न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. सध्या ऑनलाइनच्या माध्यमातून दंड जमा केला जात आहे. मात्र, राज्यात ७०० कोटी रुपयांहून अधिक वाहतूक नियम उल्लंघन केलेला दंड थकीत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर सुमारे २८० कोटी रुपये म्हणजे सुमारे ४० टक्के रक्कम थकली आहे.

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करतात. पण वाहनचालकांनी दंड न भरल्यास वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. आरटीओच्या नियमानुसार, वाहतुकीच्या गुन्ह्यानुसार दंडाची तरतूद आहे. गुन्ह्याच्या प्रमाणानुसार वेगवेगळा दंड आहे, तसेच गुन्ह्याची पुरावृत्ती झाल्यास दंडाच्या रकमेतही वाढ होते. वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्याला १५ दिवसांच्या आत ई-चलन दंड भरावा लागतो. १६व्या दिवसापासून पैसे देण्यास विलंब केल्याबद्दल प्रतिदिन १० रुपये दंड आकारला जातो.

आरटीओ विभागानं २ महिन्यांपासून ई-चलन सुरू केलं आहे. वाहनचालक आता पाकिटे, क्रेडिट/ डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंग वापरून कोणत्याही स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवरून ई-चलन दंड भरू शकतात. वाहन निरीक्षक वाहन थांबवून कारवाई करतात. वाहतूक निरीक्षक स्पीडगन किंवा सीसीटीव्हीव्दारे करत नाहीत. त्यामुळे एक कारवाई करत असताना दुसरी वाहनं निघून जात असून, त्यांच्यावर कारवाई करणं अवघड होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा