मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. मुंबई विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वे पावसामुळं विस्कळीत झालेली होती. त्यामुळे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. परिणामी कल्याण स्थानकाह प्रचंड प्रवासी अडकून राहिले.
अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने अंबरनाथ ते कर्जत ही रेल्वे वाहतूकही ठप्प झाली होती.
तर, सीएसएमटीच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेनही धीम्या गतीनं सुरु असल्याचं पाहायला मिळालं.
फक्त रेल्वे सेवाच नव्हे, तर मुंबईतील रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम दिसत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
हेही वाचा