गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मुंबईतील हजारो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जातात. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून गणेशोत्सवाच्या काळातील गाड्यांचे बुकिंग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा गणरायाचे आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे. त्यासाठी येत्या १६ मे पासून गणपतीसाठीच्या रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरु होणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी चार महिने आधी रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होते. त्याप्रमाणेच यंदा १६ मे पासून तिकीट बुकिंगला सुरुवात होईल.
कोकणातील गाड्यांचे आरक्षण
उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त कोकण आणि मध्य रेल्वेने संयुक्तपणे २६ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
या सर्व गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबतील.
www.irctc.co.in या संकेतस्थळावर आजपासून विशेष शुल्कासह या गाड्यांचे तिकीट बुकिंग सुरु झाले आहे.
हेही वाचा