मुंबई - पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी एक खुषखबर आहे. रेल्वेने १० ऑक्टोबरपासून आठ फेऱ्यांची वाढ केलीय. तसेच १० फेऱ्यांचा विस्तार केला आहे. त्याचप्रमाणे उपनगरीय मार्गावर चालणाऱ्या पाच फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. गेली अनेक वर्ष पश्चिम रेल्वेवर गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होतेय.