मुंबई - मुंबई रेल्वे प्रवासात दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत चालली आहे. रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी एका दिवसात 12 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी झाले. अजूनही अनेक मृतांची ओळख पटलेली नाही. तर, रेल्वे रूळ ओलांडताना सर्वांत जास्त अपघात झाल्याचं स्पष्ट झालंय. .
ट्रेनमधून पडणं, खांबांना धडकणं, ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणं, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणं, रुळांवर आत्महत्या करणं, नैसर्गिक मृत्यू असे अपघात मोठ्या प्रमाणात होताना दिसतात.
मध्य रेल्वे मेनलाइन, हार्बर आणि उपनगरीय मार्गावर झालेल्या अपघातांत मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात झाले आहेत. मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत.
स्टेशन | मृतांची संख्या | जखमींची संख्या |
दादर | 1 | 0 |
कुर्ला | 2 | 1 |
ठाणे | 3 | 1 |
डोंबिवली | 0 | 1 |
कल्याण | 2 | 0 |
कर्जत | 0 | 1 |
वाशी | 2 | 0 |
वडाळा रोड | 1 | 0 |
चर्चगेट | 0 | 1 |
मुंबई सेंट्रल | 0 | 1 |
अंधेरी | 0 | 1 |
बोरीवली | 0 | 1 |
वसई | 1 | 1 |