Advertisement

लोकलचं सध्याचं वेळापत्रक १५ दिवसांनंतर बदलणार?

रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे एकूण १५ दिवसांत रुग्णसंख्येत वाढ न झाल्यास मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

लोकलचं सध्याचं वेळापत्रक १५ दिवसांनंतर बदलणार?
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यापासून आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास येत्या १५ दिवसांनंतर लोकलचं सध्याचं वेळापत्रक बदलण्याचा विचार करू, असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे. सुरेश काकाणी यांनी सोमवारी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील लसीकरण केंद्रात लस टोचून घेतली. त्या वेळी प्रसारमाध्यमांना त्यांनी ही माहिती दिली. 

प्रमुख रुग्णालयांसह एकूण २१ केंद्रांवर ‘कोविड १९’ लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र कोणत्याही केंद्रावर जाऊन लस घेण्याची सवलत, समुपदेशन यामुळे आता ७० ते ८० टक्के कर्मचारी लस घेण्यासाठी केंद्रावर हजेरी लावत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोविड आघाडीवर कार्यरत इतर सेवकांचे (फ्रंटलाइन वर्कर्स) लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्त काकाणी यांना साेमवारी लस देण्यात आली. मुंबईतील लसीकरणासाठी आवश्यक असलेला साठा उपलब्ध असून टप्प्याटप्प्याने येथील लसीकरण मोहीम सुरळीत सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबईत लोकल सेवा सुरू झाल्यानंतरही मागील आठवडाभरात कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. हे चित्र दिलासादायक असलं तरी कोरोना आटोक्यात येत आहे.

गाफील राहून चालणार नाही. मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या निर्देशांचे पालन करणे यापुढेही आवश्यक असल्याचं सुरेश काकाणी यांनी सूचित केलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाल्यानंतर पात्र व्यक्तींनी लस घ्यावी. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, असंही आवाहन त्यांनी केलं.

महापालिकेला आतापर्यंत २ टप्प्यांमध्ये मिळून २ लाख ६५ हजार लसींचा साठा मिळाला आहे. पहिला आणि दुसरा टप्पा मिळून आतापर्यंत ७५ हजार ७५१ जणांना लस देण्यात आली आहे. यात ७२ हजार ३८८ आरोग्य कर्मचारी तर तीन हजार ३६३ फ्रंटलाइन वर्कर्स यांचा समावेश आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत एका रुग्णालयात चाचण्या करण्यात येत आहेत.

जन्माला आलेल्या नवजात शिशूच्या प्रतिजैविकांबाबत तपासण्या केल्या जात आहेत. लोकल सर्वांसाठी सुरू करून एक आठवड्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र सुदैवाने रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे एकूण १५ दिवसांत रुग्णसंख्येत वाढ न झाल्यास मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे काकाणी यांनी स्पष्ट केले. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा