Advertisement

कोरोनामुळं लोकल प्रवासावर पुन्हा निर्बंध होणार?

राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. राजधानी मुंबईत कोरोना प्रचंड वेगात पसरतो आहे.

कोरोनामुळं लोकल प्रवासावर पुन्हा निर्बंध होणार?
SHARES

राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. राजधानी मुंबईत कोरोना प्रचंड वेगात पसरतो आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सरकारची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत मुंबई आणि उपनगरातील सर्वसामान्यांची लाईफलाईन मानली जाणारी लोकलवर राज्य सरकार पुन्हा निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी  प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना या विषयावर भाष्य केलं.

'सर्वसामान्य नागरिकांनी नियम पाळले पाहिजे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. पण लोकांनी नियम पाळले नाहीत तर लोकलबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील', असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना राज्यात पुन्हा लॉकडाऊन होईल, अशी भीती वाटत आहे. याबाबत आरोग्य मंत्र्यांना प्रश्न विचारला असता, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे, असं त्यांनी सांगितलं.

'मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यात आढावा घेऊ असं म्हटलं आहे. ही बैठक या आठवड्यात कधीही होऊ शकेल. उद्या कैबिनेट बैठक आहे. या बैठकीत लॉकडाऊन आणि कोरोना स्थितीवर सविस्तर चर्चा होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या चर्चेअंती पुढील उपाययोजना आणि निर्णय घेतले जातील', असं देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत कुठलीही लपवाछपवी होत नाही. इतर राज्यात बहुदा आकडे लवपले जात असतील, अशी शंका टोपे यांनी व्यक्त केली आहे. कारण काही राज्यात निवडणूक होत आहे. मोठ्या सभा होत आहेत. पण तिथली रुग्णसंख्या कमी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत मोठं राज्य आहे. महाराष्ट्रात साडे बारा कोटी लोक राहतात. त्यामुळे तुलना करायची झाल्यास रुग्णसंख्येत महाराष्ट्राच्या पुढेही काही राज्य असल्याचं टोपे म्हणाले.



हेही वाचा - 

राज्यात मंगळवारी १३२ रुग्णांचा मृत्यू, २८,६९९ नवे रुग्ण

यंदा होळी सण साजरा करण्यास मनाई


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा