२५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली आहे. या विमान सेवेच्या माध्यमातून मुंबईत अडकलेले अनेक प्रवाशी त्यांच्या राज्यात गेले व परराज्यातूनही अनेक प्रवाशी मुंबईत दाखल झाले. परराज्यातून मुंबईत आलेल्या प्रवाशांच्या डाव्या हातावर आता स्टॅम्प मारण्यात येणार असल्याची माहिती मिळते. तसंच, या सर्व प्रवाशांना १४ दिवस घरीच एकांतवासात राहणं बंधनकारक असणार आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व नागपूर या तिन्ही विमानतळांवर परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांच्या डाव्या हातावर आता स्टॅम्प असणार आहे. मुंबईहून दररोज ५० विमानांच्या ये-जा करण्याला परवानगी देताना राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांव्यतिरिक्त स्वत:ची नियमावली जाहीर केली आहे.
महाराष्ट्रात राज्य सरकारनं एका विमानतळावरून अधिकाधिक २५ विमानांचे उड्डाण व २५ विमानांच्या उतरण्याला परवानगी दिली आहे. त्यामध्ये सर्वाधिक विमानोड्डाणं अर्थातच मुंबईहून सुरू झाली आहेत. परंतु या सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना राज्य सरकारच्या नियमावलीचं पालन करावं लागणार आहे.
राज्य सरकारची नियमावली
हेही वाचा -
मुंबईत कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढ घटली, 'असा' आहे वाॅर्डनुसार रुग्णवाढीचा दर
स्विगी-झोमॅटोला 'काटे की टक्कर', अॅमेझॉन सुरू करतेय 'ही' सेवा