मुंबईसह आसपासच्या परिसरात सोमवार १ मार्चपासून रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली. प्रत्येक भाडेवाढ ही ३ रुपयानं करण्यात आल्यानं प्रवाशांना आता रिक्षाच्या प्रवासासाठी २१ रुपये आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी २५ रुपये मोजावे लागणार आहेत. परंतू, भाडेवाढीच्या पहिल्याच दिवशी नवीन भाडेदरासाठी मीटरमध्ये बदल करण्यास दिलेली ३ महिन्यांची मुदत आणि अद्याप चालकांच्या हाती नवे दरपत्रकच न मिळाल्यानं पहिल्या दिवशी प्रवाशांनी जुन्या भाडेदरानंच प्रवास केला. प्रवासी कमी मिळत असल्यानं भाडेवाढ होऊनही ती घेण्यास चालकांनी तयारी दर्शवली नाही.
मागील ५ वर्षांत रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळं यंदा दोन्ही सेवांसाठी किमान ३ रुपये भाडेवाढ करण्यात आली आहे. यामध्ये रिक्षाचं सुरुवातीचं दीड किलोमीटरचं भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले आहे. तर रात्रीच्या भाडेदरातही बदल झाले आहेत. नवीन भाडेदरासाठी चालकांना मीटरमध्ये बदल (रिकॅ लिब्रेशन) करावे लागणार असून त्यासाठी मे महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तोपर्यंत नवीन भाड्याची आकारणी दरपत्रकानुसार करण्यात येणार आहे. हे दरपत्रक चालकांना परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल किंवा रिक्षा, टॅक्सी संघटनांकडून त्याची छापील प्रत मिळणार आहे. त्यावर परिवहनचे बारकोड आवश्यक आहे. परंतु, सोमवारी अनेक चालकांकडे नव्या भाड्याचं दरपत्रकच नव्हतं. त्यामुळं प्रवासी रिक्षात बसल्यानंतर जुन्या मीटरप्रमाणंच भाडे आकारणी होत होती.
काही चालकांना भाडेवाढ झाल्याची माहितीही नाही. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष करून ते नेहमीप्रमाणे भाडे आकारणी करीत होते. संघटनांकडून दरपत्रक मिळाले नाही, भाडेवाढ झाल्याचे कुणीही सांगितले नाही, रिकॅ लिब्रेशनसाठी मुदत आहे अशी अनेक कारणे चालकांकडून पहिल्याच दिवशी पुढे के ली जात होती. अनेक चालकाकडे स्मार्टफोन नसल्यानं संकेतस्थळ व वॉट्सअॅपद्वारे दरपत्रक मिळणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मीटरमध्ये बदल