मुंबईत आता वेगाने गाडी चालवणं महाग पडणार आहे. प्रती तास ७० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवल्यास तुम्हाला वाहतूक पोलिसांकडून ई -चलन येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना स्पीड लिमीट ओलांडल्यास दंड भरावा लागेल. वाढती वाहतूक कोंडी आणि रॅश ड्रायव्हिंगमुळे वाहतुकीच्या नियमात बदल करण्यात आले आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी वाहनांच्या वेगाची नवीन मर्यादा जाहीर केली आहे. मुंबईत आता वाहनांची वेग मर्यादा प्रती तास ७० किमी करण्यात आली आहे. वेगाची मर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांना ई - चलनामार्फत दंड भरावा लागू शकतो. ९० टक्के मुंबईमध्ये सीसीटीव्ही बसवलेले आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना सीसीटीव्हीच्या दंडाची पावती वाहतूक पोलीस घरपोच पाठवणार आहेत.
अशी आहे मुंबईत वेग मर्यादा
हेही वाचा -