Advertisement

मुंबई : प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार

नवीन वेळापत्रक आजपासून म्हणजेच २८ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहे.

मुंबई : प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार
SHARES

मुंबई मेट्रोने वेळापत्रकात मोठा बदल केला असून आता मेट्रो पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांच्या सेवेत असणार आहे. नवीन वेळापत्रक आजपासून म्हणजेच २८ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहे.

आता मुंबई मेट्रोची वर्सोवा मेट्रो स्टेशन आणि घाटकोपर मेट्रो स्टेशनवरून सुटणारी पहिली मेट्रो पहाटे साडेपाच वाजता सुटणार आहे. त्यामुळे वर्सोव्याहून शेवटची मेट्रो 11.20 वाजता आणि घाटकोपरहून 11.45 वाजता सुटणार आहे.

एमएमओपीएलने दिलेल्या माहितीनुसार वर्सोवा आणि घाटकोपर मेट्रो स्थानकावरून सकाळी साडेपाचला पहिली गाडी सुटण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीच्या वेळेत मात्र कोणताही बदल झालेला नाही. घाटकोपर मेट्रो स्थानकावरून रात्री 11.44 ला शेवटची गाडी सटते तर वर्सोवा मेट्रो स्थानकावरून रात्री 11.19 ला शेवटची गाडी सुटते ती रात्री 12.07 ला घाटकोपरला पोहचते.

याबाबतची सविस्तर माहिती मुंबई मेट्रोने जारी केली आहे.

आठवड्याच्या दिवसातील दैनंदिन सहली 366 वरून 380 पर्यंत वाढतील. सेवा वारंवारता तीच राहील जी पीक अवर्समध्ये चार मिनिटांपेक्षा कमी असते आणि पीक अवर्समध्ये 5-8 मिनिटांपेक्षा कमी असते.

अंधेरी येथील पूर्व-पश्चिम गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपूल बंद पडल्याने मेट्रो सेवेचा वापर अधिक होऊ लागला आहे. या मेट्रो मार्गावरील सध्याच्या आठवड्यातील प्रवासी संख्या 3,80,000 एवढी आहे, जी एक तासाने कामकाजाच्या विस्ताराने किरकोळ वाढण्याची शक्यता आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा