कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. एक्स्प्रेस-वे वर खासगी वाहनांना अडवलं जात आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना फक्त परवानगी दिली जात आहे.
मुंबईतील नागरिकांनी शहराबाहेर जाऊ नये तसंच पुणे किंवा इतर ठिकाणच्या लोकांनी मुंबईत प्रवेश करु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या मुंबई-पुणे हायवेवरही पोलिसांचा बंदोबस्त आहे. खालापूर, कळंबोली, कामशेत या टोलनाक्यांवर पोलीस लोकांची ओळखपत्रं तपासत आहेत. जे लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत त्यांना घरी पाठवलं जात आहे.मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त करोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. ३१ मार्चपर्यंत सुट्टी मिळाली असल्याने मुंबईतील अनेक नागरिक पुणे, सातारा. कोल्हापूर, कोकण तसंच इतर ठिकाणी आपल्या गावी जात आहेत. लोकांना घरात थांबण्याचं आवाहन केलं जात असतानाही लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -