सालाबादप्रमाणं यावर्षीही गणरायाचं मुंबईत थाटात आगमन झालंय. आगमनाप्रमाणंच बाप्पांचा विसर्जन सोहळाही भव्यदिव्य पद्धतीनं केला जातो. बाप्पांना निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं मुंबईकर रस्त्यावर उतरतात. त्यामुळं विसर्जनावेळी वाहतुकीचं अचूक नियोजन करणं पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरतं. यावर्षीही गणेश विसर्जनासाठी पोलिसांकडून वाहतुकीचं नियोजन करण्यात आलंय. तर नेमकं कसं आहे यावर्षीच्या विसर्जनावेळचं नियोजन पाहूयात.