Advertisement

पुनर्विकास लादल्यास रस्त्यावर उतरू !


पुनर्विकास लादल्यास रस्त्यावर उतरू !
SHARES

महाराष्ट्र शासनाने धारावीच्या धरतीवर स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करून बीडीडी चाळींचा पुनर्विकास करावा अशी मागणी आखिल बीडीडी चाळीच्या सर्व संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच म्हाडामार्फत पुनर्विकास प्रकल्प बीडीडीवर लादल्यास तीव्र विरोध करण्याचा इशाराही दिला. या चाळींचा पुनर्विकास करायचा असेल तर येथील रहिवाशी आणि सर्व संघटनांचे मत विचारात घेणे गरजेचे आहे. तसेच सरकारतर्फे एकतर्फी निर्णय घेण्यात येणार असेल तर चाळीतले रहिवाशी  रस्त्यावर उतरून चोख उत्तर देतील, असा इशारा बीडीडी चाळीचे रहिवाशी महासंघाचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी दिला. एकत्रित संघाच्यावतीने झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा