पर्यूषण काळात उपवास करून यात्रा करणाऱ्या 27 जैन समुदायातील बांधवांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे जिल्हा सचिव मेहुल गोसालिया यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी 1 हजार 100 जणांसाठी मोफत ताक वाटपही केले. यासह त्यांनी पाण्याच्या बाटल्यांचेही वाटप केले.यावेळी कांदिवली ते दहिसरपर्यंत रथ यात्राही काढण्यात आली.