मुंबईच्या मालाडमध्ये नेव्ही भरतीदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये परीक्षेसाठी आलेले अनेक उमेदवार गंभीर जखमी झाले आहेत. मालाडच्या मार्वेत ‘आयएनएस हमला’मध्ये दोन दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातून 10 हजारांहून अधिक तरुण भरतीच्या परीक्षेसाठी आले होते. मात्र इथे राहण्याची आणि जेवणाची सोय नसल्याने विद्यार्थी नाराज झाले आणि अचानक चेंगराचेंगरी झाली.