दादर - विद्यार्थी भारतीच्या वतीनं १०व्या वर्धापन दिनानिमित्त 'युद्ध नको, शिक्षण हवं' या संकल्पनेला घेऊन चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ नोव्हेंबरला माटुंगा कल्चरल हॉल, यशवंत नाट्यमंदिरच्या बाजूला दादर पश्चिम येथे ४ ते ८ या वेळेत ही स्पर्धा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न या स्पर्धेत केला जाणार आहे. तसंच द्वेषाची भावना निर्माण करुन प्रश्न सूटत नाहीत तर ते शांततेच्या, अहिंसक मार्गाने देखील सोडवू शकतो असा विचार या स्पर्धेदरम्यान मांडला जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ७२०८८५७७५१, ८०९७६३४३६४ या नंबरवर संपर्क करु शकता.