Advertisement

रशिया-युक्रेन वादाच भारतावर काय होईल परिणाम?

रशिया युक्रेन युद्ध पेटल्यास भारतावरही याचा परिणाम होणार आहे. या ६ मुद्द्यांमधून जाणून घ्या भारतावर काय परिणाम होणार ते...

रशिया-युक्रेन वादाच भारतावर काय होईल परिणाम?
SHARES

रशिया-युक्रेनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. रशियानं हल्ला केल्यास युक्रेनच्या बाजूनं उतरणार असल्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे. या घडामोडींचे पडसाद जागतिक राजकारणावर आणि अर्थकारणावर होण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्ध पेटल्यास भारतावरही याचा परिणाम होणार आहे.

  • खाद्य तेलाच्या किंमती वाढणार

आजच्या परिस्थितीनुसार, भारताच्या सूर्यफूल तेलाच्या आयातीपैकी ९०% युक्रेन आणि रशियाचा वाटा आहे. सूर्यफूल तेल हे पाम, सोया आणि इतर पर्यायांसोबत भारतात वापरल्या जाणार्‍या सर्वात लोकप्रिय खाद्यतेलांपैकी एक आहे. खरे तर, सूर्यफूल तेल हे फक्त पाम तेलाच्या खालोखाल दुसरे सर्वात जास्त आयात केलेले खाद्यतेल आहे.

२०२१ मध्ये, भारतानं १.८९ दशलक्ष टन सूर्यफूल तेल आयात केले. यापैकी ७०% एकट्या युक्रेनमधून होते. रशियाचा २०% आणि उर्वरित १०% अर्जेंटिनाचा होता.

"भारत दर महिन्याला सुमारे २ लाख टन सूर्यफुलाच्या बियांच्या तेलाची आयात करतो आणि काही वेळा ती दरमहा ३ लाख टनांपर्यंत जाते. भारत सुमारे ६०% खाद्यतेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. कोणत्याही जागतिक विकासावर परिणाम होईल," इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी आयएएनएसला सांगितलं.

युक्रेन दरवर्षी सुमारे १७ दशलक्ष टन सूर्यफुलाच्या बियांचं उत्पादन करते, तर रशिया सुमारे १५.५ दशलक्ष टन बियाणे तयार करतो. अर्जेंटिना या दोन देशांपेक्षा खूप मागे आहे आणि सुमारे ३.५ दशलक्ष टन सूर्यफुलाच्या बियांचे उत्पादन करतो.

रशियासोबतच्या तणावादरम्यान, युक्रेननं फेब्रुवारीमध्ये सूर्यफूल तेलाची एकही शिपमेंट पाठवली नाही. फेब्रुवारी-मार्च कालावधीत युक्रेनमधून नेहमीची शिपमेंट १.५ ते २ दशलक्ष टन सूर्यफुलाच्या बियाण्यांच्या दरम्यान असते आणि सध्या सुरू असलेला संघर्ष दोन-तीन आठवडे चालू राहिल्यास भारतीय बाजारावर त्याचा ताण पडेल.

"रशिया-युक्रेनचा त्रास आणखी २/३ आठवडे कायम राहिला, तर तेलाचा साठा पुन्हा भरून निघणार नाही म्हणून भारतीय बाजारावर दबाव राहील," असं देसाई पुढे म्हणाले.

  • कच्च्या तेलाच्या किमती वाढतील?

कच्च्या तेलाला देखील रशिया-युक्रेन संकटाचा सामना करावा लागला आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती प्रति बॅरल सुमारे $१०० पर्यंत वाढल्या आहेत. हे दर ४% पेक्षा जास्त आहेत.

सरकारनं ४ नोव्हेंबर रोजी उत्पादन शुल्कात कपात केल्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कायम आहेत. तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमती $१०नं वाढल्या आहेत.

सध्या सुरू असलेल्या निवडणुका किंमती स्थिर होण्याचे कारण असू शकतात, परंतु ७ मार्च रोजी मतदान संपल्यानंतर त्यात सुधारणा होऊ शकते.

  • गॅसच्या किमतीवर परिणाम

भारत त्याच्या निम्म्याहून अधिक गॅस गरजा युक्रेनमधून लिकविड नॅचरल गॅस (LNG) आयात करून पूर्ण करतो. भारताच्या एलएनजी वापराचा एक छोटासा भाग रशियाकडून आयात करून भागवला जातो.

  • फार्मा क्षेत्रालाही याचा फटका

युक्रेनला भारताच्या मुख्य निर्यातीत औषधी उत्पादनांचा समावेश होतो. जर्मनी आणि फ्रान्सनंतर भारत हा युक्रेनला फार्मास्युटिकल उत्पादनांचा तिसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे.

Ranbaxy, Sun Group आणि Dr Reddy’s Laboratories सारख्या कंपन्यांची युक्रेनमध्ये प्रतिनिधी कार्यालये आहेत आणि फार्मास्युटिकल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील युक्रेनमध्ये इंडियन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IPMA) ची स्थापना केली आहे.

  • भारताच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम

भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करतो. भारतीय लष्करात जवळपास ६० टक्के शस्त्रे ही रशियन बनावटीची आहेत. त्याशिवाय रशियाकडून एस-४०० ही क्षेपणास्त्रविरोधी एअर डिफेन्स सिस्टीम भारताला मिळणार आहे. युद्ध पेटल्यास रशियावर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रशियाकडून भारताला होणारा शस्त्र पुरवठा खंडित होऊ शकतो.

  • रशिया-चीनची जवळीक डोकेदुखी

युद्ध झाल्यास रशिया चीनकडे मदत मागू शकतो. ही स्थिती भारतासाठी भविष्यात चिंताजनक होऊ शकते. रशिया-चीन मैत्रीमुळे भारत-चीन सीमा प्रश्नात नवा वाद होऊ शकतो.



हेही वाचा

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा