Advertisement

दिवसाला १०० मेसेजची मर्यादा संपुष्टात : ट्राय

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियानं (ट्राय) हा निर्णय घेतला आहे.

दिवसाला १०० मेसेजची मर्यादा संपुष्टात : ट्राय
SHARES

एका सीममधून दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आता संपुष्टात आली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियानं (ट्राय) हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर १०० मेसेजनंतर, पुढील मेसेजवर लागणारा ५० पैसे चार्जही बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ट्रायच्या या निर्णयामुळे आता दिवसाला १००हून अधिक मेसेज करता येऊ शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मेसेजसाठी टॅरिफच्या नियमांबाबत ट्रायनं ‘टेलिकम्युनिकेशन टॅरिफ ऑर्डर 2020’चा ड्राफ्ट तयार केला आहे.

टेलिकॉम ऑपरेटर्स आतापर्यंत दररोज १०० मेसेजच्या मर्यादेनंतर प्रत्येक मेसेजसाठी कमीत कमी ५० पैसे चार्ज आकारतात. २०१२ हा नियम लागू झाला होता. टेलिकॉम सब्सक्रायबर्सला UCC (अनसॉलिसिटेड कमर्शल कम्युनिकेशन्स) पासून वाचवण्यासाठी ट्रायनं रोज १०० मेसेजची मर्यादा ठेवली होती.

कंपन्यांना स्पॅम एसएमएसवर बंदी घालण्यासाठी नवीन मार्ग आणण्याबाबत ट्राय सांगत आहे. ट्रायनं 2017 मध्ये UCCवर बंदी घालण्यासाठी टीसीसीसीपीआर सादर केले होते. नवीन रेग्युलेटरी फ्रेमवर्क टेक्नोलॉजीवर आधारित टीसीसीसीपीआर आहे. स्पॅम एसएमएसवर हे अंकुश लावू शकते. स्पॅम एसएमएसवर बंदी घालण्यासाठी ट्रायनं १०० मेसेजनंतर त्यापुढील मेसेजवर ५० पैसे चार्ज लावला होता. हा चार्ज टीसीसीसीपीआर (टेलिकॉम कमर्शल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफेरेंस रेग्युलेशन्स) च्या रुपात लागू झाला होता. परंतु तो आता मागे घेण्यात आला आहे.

ट्रायनं हा निर्णय लागू करण्यासाठी टेलिकम्युनिकेशन्स टॅरिफ ऑर्डर, २०२०चा ड्राफ्ट तयार केला होता. २०१२ साली यात मेसेजसंबंधी लावण्यात आलेला नियम मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. म्हणजेच दररोज १०० मेसेजनंतर त्यापुढील मेसेजवर ५० पैसे चार्ज हटवण्याचा प्रस्ताव ट्रायनं दिला होता. त्यानंतर ट्रायनं स्टेकहोल्डर्सकडून ३ मार्चपर्यंत लिखित आणि १७ मार्चपर्यंत काऊंटर प्रतिक्रिया मागवल्यानंतर हा निर्णय ट्रायनं घेतला आहे.



हेही वाचा

एलपीजी गॅस सिलिंडर महागला

मोबाईल नंबर आता 11 अंकी होणार, 'हे' आहे कारण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा