मुंबईतील (mumbai) 117 वर्षे जुन्या 'स्वदेशी मार्केट'चा (Swadeshi market) लवकरच पुनर्विकास केला जाईल, असे भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
शहरातील या ऐतिहासिक मार्केटचा पुनर्विकास (redevelop) नक्कीच केला जाईल आणि या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही सदस्याला कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने आपण स्वतः हमी देत असल्याचेही रविंद्र चव्हाण यांनी पुढे नमूद केले.
काळबादेवी येथील स्वदेशी मार्केटच्या 117 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, हे मार्केट केवळ एक व्यापारी केंद्र नसून, देशाच्या 'स्वदेशी चळवळी'च्या गौरवशाली वारशाचे प्रतीक आहे.
महान क्रांतिकारक बाबू गेनू यांचे स्मरण करताना ते म्हणाले की, परदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक अडवताना याच काळबादेवी परिसरात बाबू गेनू यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते.
तसेच त्यांचे हे बलिदान आजही देशवासीयांना 'स्वदेशी'चा स्वीकार करण्याची प्रेरणा देत आहे.
या प्रसंगी, स्वदेशी मार्केट संस्थेचा 117 वर्षांचा इतिहास दर्शवणारे एक विशेष टपाल पाकीट (लिफाफा) देखील प्रकाशित करण्यात आले.
या कार्यक्रमात चव्हाण यांनी असेही नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत देशाने विकासाची नवी शिखरे गाठली आहेत.
"मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड" (भारतात निर्मिती, जगासाठी निर्मिती) या तत्त्वांतर्गत, भारतात बनवलेली उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्र सरकारही या दिशेने वेगाने काम करत असून, यामुळे राज्याच्या विकासाला आणखी गती मिळेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
या कार्यक्रमाला स्वदेशी मार्केट संस्थेचे अध्यक्ष सुमित मेहरा, नवी मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिताताई जोशी, तसेच भाजपचे स्थानिक नगरसेवक आकाश राजपुरोहित आणि रीटा मकवाना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा
