Advertisement

मेट्रो लाईन 9 साठी 12 हजार झाडांची कत्तल होणार

राज्य सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या कामांसाठी EIA पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन 2006 लागू नाही. पण पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे की, या नियमात बदल करण्याची गरज आहे.

मेट्रो लाईन 9 साठी 12 हजार झाडांची कत्तल होणार
SHARES

मुंबईमध्ये (mumbai) मेट्रो लाईन 9 च्या कामामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाईंदरमध्ये (bhayandar) मेट्रो 9 चा डेपो बनवण्यासाठी हजारो झाडं तोडली जाणार आहेत. विशेष म्हणजे, MMRDA ने या कामासाठी कोणतीही पर्यावरणीय पाहणी केली नाही, असा आरोप आहे.

आरटीआय कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागवली होती. मेट्रो लाईन 9 च्या वाढीव भागासाठी, डोंगरी येथे नवीन डेपो बनणार आहे. यासाठी MMRDA ने EIA रिपोर्ट अर्थात पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन सादर केलं नाही, असं RTI मध्ये समोर आलं आहे.

पिमेंटा म्हणाले, मेट्रो आणि रेल्वेच्या कामांना कायद्यानुसार पर्यावरणीय परवानगी लागत नाही. पण MMRDA सारख्या संस्थांनी EIA करणं अर्थात पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन आवश्यक आहे. EIA केल्याने पर्यावरणावर काय परिणाम होईल, हे समजतं आणि त्यावर उपाय शोधता येतात.

2017 मध्ये MMRDA ने मेट्रो लाईन 7 साठी पर्यावरणीय मूल्यांकन केलं होतं. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने तो पर्यावरणीय मूल्यांकन केला होता. त्यामध्ये हवा, पाणी, आवाज, जमीन आणि जैवविविधता यांचा अभ्यास करण्यात आला होता. पिमेंटा यांच्या म्हणण्यानुसार, डोंगरीसाठी सुद्धा असाच अभ्यास करायला हवा होता.

राज्य सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या कामांसाठी EIA पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन 2006 लागू नाही. पण पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे की, या नियमात बदल करण्याची गरज आहे.

एनजीओ 'वनशक्ती'चे स्टॅलिन डी म्हणाले, हे अतिशय चुकीचं आहे. डेपोसाठी आधीच मोकळी जमीन उपलब्ध होती. त्या जमिनीवर झाडं नव्हती आणि ती सार्वजनिक कामासाठी योग्य होती. सरकारने ती जमीन खाजगी विकासकांना दिली आणि आता डोंगरावरची घनदाट जंगलं तोडून तिथे डेपो बनवत आहेत.

स्टॅलिन यांच्या माहितीनुसार, जवळपास 12 हजार झाडं तोडली जाणार आहेत. त्यात 900 आंब्याची झाडं आहेत. आरेमध्ये 4 हजार झाडं तोडण्यावरून खूप गदारोळ झाला. पण या झाडांच्या तोडण्याबद्दल कुणी बोलत नाही, असं ते म्हणाले.

स्टॅलिन पुढे म्हणाले की, कोस्टल रेग्युलेशन झोन आणि पर्यावरणीय परवानगी मिळवण्याआधीच सरकारने झाडं तोडायला सुरुवात केली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते: चांगली जमीन बिल्डरांना द्यायची आणि सार्वजनिक कामं जंगलात ढकलायची.

पर्यावरणाचे नियम पाळले गेले पाहिजेत. MMRDA ने या प्रकरणावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आता या प्रकरणावर सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय सामान्य नागरिकांमध्येही याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

मेट्रो लाईन 9 ही लाईन 7 चा भाग आहे. Metro Line 9 अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दहिसर ते मीरा-भाईंदरला जोडते. या लाईनची लांबी 13.58 किलोमीटर आहे.

यात 11.39 किलोमीटरचा मार्ग एलिवेटेड अर्थात उंचावरून जाणारा आहे आणि 2.19 किलोमीटरचा मार्ग अंडरग्राऊंड अर्थात जमिनीखालून जाणारा आहे. या मार्गावर 10 स्टेशन्स असतील.

ही लाईन सुरू झाल्यावर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न रेल्वे, मेट्रो लाईन 2ए (दहिसर - डी. एन. नगर) आणि मेट्रो लाईन 7 (अंधेरी-दहिसर) यांना जोडली जाईल. या लाइनमुळे प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्क्यांनी कमी होईल, असा दावा एमएमआरडीने केला आहे.



हेही वाचा

मुंबईत 6,700 हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी

मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारतच्या डब्ब्यांची संख्या वाढवली

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा