Advertisement

बेस्ट, रेल्वेतील 'इतक्या' करोनायोद्ध्यांचा मृत्यू


बेस्ट, रेल्वेतील 'इतक्या' करोनायोद्ध्यांचा मृत्यू
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात बेस्ट व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा दिली. आपला जीव धोक्यात घालून हे कर्मचारी आपलं कार्य बजावत होते. परंतु, कोरोनामुळं अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानुसार, गेल्या १० महिन्यांत मुंबईत पश्चिम व मध्य रेल्वेबरोबरच बेस्ट उपक्रमातील कार्यरत १२३ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

या मृत कर्मचाऱ्यांमध्ये बेस्टच्या ६० तर रेल्वेच्या ६३ कर्मचाऱ्यांनी जीव गमावला आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा सुरूच होती. त्यामुळे चालक, वाहकांसह आगार, बस स्थानकातील कर्मचारी कार्यरत होते. याबरोबरच विद्युत व अभियंता विभागही अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत होता. या काळात अनेकांना कोरोनाची लागण झाली.

बेस्टमध्ये प्रत्यक्षात कर्तव्यावर असलेल्या एकूण २ हजार ८६३ जणांना करोनाची लागण झाली आणि त्यातील ६० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर २ हजार ७३९ करोनामुक्त झाले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. बेस्ट उपक्रमाने आतापर्यंत एकूण १३४ शिबीर घेऊन त्यात ९ हजार २६ कर्मचाऱ्यांची प्रतिजन चाचणी केली असता ३८ जण करोनाबाधित आढळले. सप्टेंबरपर्यंत बेस्टमधील २७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. आक्टोबरअखेरीस हीच संख्या ५०पर्यंत पोहोचली. मृत कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चालक-वाहकच आहेत.

बेस्टकडून अत्यावश्यक सेवा दिली जात असतानाच पश्चिम व मध्य रेल्वेनेही लोकल सेवा आणि विशेष मेल-एक्स्प्रेस गाड्या चालवल्या. त्यामुळे मोटरमन, लोको पायलट, कारशेड, यार्डात काम करणारे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान व अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी सेवेसाठी उपस्थित होते. कर्तव्य बजावत असताना यातील ६३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

सर्वाधिक मध्य रेल्वेच्या ३५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम रेल्वेच्या २८ कर्मचारीही दगावले आहेत. पश्चिम रेल्वेच्या एकू ण १ हजार ४२७ आणि मध्य रेल्वेच्या १ हजार ३५१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती.

यामध्ये रेल्वेच्या सेवेतील कर्मचारी, निवृत्त अधिकारी व कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय सदस्यांचा अशा २१० जणांचा मृत्यू मुंबईतील रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यात प्रत्यक्षात रेल्वेचे कर्मचारी ६३ असल्याची माहिती दिली.

बेस्ट उपक्रमाच्या विविध विभागातील कर्तव्यावर नसताना १०९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आणि त्यातील १२ जणांचा मृत्यू झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गावी जाण्यासाठी किं वा  अन्य कामानिमित्त हे कर्मचारी सुट्टीवर होते. त्यावेळी कर्मचारी करोनाबाधित झाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा