अंधेरी पश्चिमेकडील अंबोली परिसरातील रहिवाशांना सद्यस्थितीत पाणी भरण्यासाठी मध्यरात्री ३.३० ते ५ दरम्यान झोपमोड करून उठावे लागते. पण येत्या बुधवारपासून रहिवाशांना निवांत झोप घेता येणार आहे. यामागचे कारण म्हणजे या भागात महापालिकेने नवीन जलवाहिनी टाकली असून रहिवाशांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. याचसोबत या विभागातील पाण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला असून सकाळी पावणे आठच्या सुमारास पाणी सोडण्यात येणार आहे.
महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. येत्या बुधवारी ४ ऑक्टोबर २०१७ पासून हे नवीन वेळापत्रक लागू होणार. या भागातील एस. व्ही. रोड, जे. पी रोड, वीरा देसाई रोड तसेच पंचम सोसायटी आदी परिसराला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येत असल्याची माहिती जलअभियंता अशोक तवाडिया यांनी दिली आहे. जलवाहिनी नव्याने टाकण्यात आल्यामुळे त्यांचे फ्लशिंग आणि क्लोरीनेशन केले आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सुरुवातीचे दोन दिवस पाणी गाळून तसेच उकळून पिण्याचे आवाहन तवाडिया यांनी केले आहे.
हेही वाचा -
पाण्यासाठी महिलांची झोपमोड का? राष्ट्रवादी काँग्रेसचा महापालिका आयुक्तांना सवाल
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)