मुंबईत जर एखाद्या ठिकाणी मोठी आग लागली असेल तर ते हाताळणे आता अग्निशमन दलाला अधिक सोपे जाणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने 14 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याचे 11 नवीन जम्बो टँकर खरेदी केल्या आहेत.
अग्निशन दलात यापूर्वी वापरल्या जाणाऱ्या जुन्या पाण्याच्या टँकर्सची जागा आता नवीन अकरा टँकर्सने घेतली आहे. यामध्ये उच्च-दबाचे पंंप, रबरी नलिका (बेलनाकार स्पिंडल) आणि जास्त पाण्याची क्षमता या सुविधा उपलब्ध आहेत. हे नवीन टॅंकर निश्चितच अग्निशमन दलाला आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत करेल.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलप्रमुख प्रभात रहांगदळे यांनी म्हटले आहे की, आग लागल्यानंतर पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासते. आता या नवीन जम्बो टँकर्समुळे अग्निशन दलातील जवानांना मदत मिळू शकेल.