गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कोरोना रुग्णसंख्या घटल्यानं मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून, मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क खुले होणार आहेत. याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क ५० टक्के क्षमतेनं सुरू होणार आहेत.
#COVID19 | Mumbai eases curbs: Restaurants, theatres can operate at 50% capacity, night curfew lifted
— ANI (@ANI) February 1, 2022
"Local tourist spots to remain open as per normal timing. Weekly Bazzars to remain open as per normal timing," reads the order pic.twitter.com/WWVdIT9xUm
ओमिक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारनं घेतला. मुंबईतील रुग्णसंख्या दोन दिवसापासून हजाराच्या आत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याने मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.
लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरू?