देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. अशा परिस्थितीत सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. रेल्वे मंत्रालय पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. काही शहरांमधून विशेष रेल्वे सुरू होऊ शकते. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विविध राज्यांमध्ये अडकलेल्यांना मोठी मदत मिळू शकते.
Indian Railways plans to gradually restart passenger train operations from 12th May, 2020, initially with 15 pairs of trains
— Ministry of Railways (@RailMinIndia) May 10, 2020
These trains will be run as special trains from New Delhi Station connecting 15 important cities of the countryhttps://t.co/tOvEFT1C8Z pic.twitter.com/dvdxKaxshM
एएनआय या वृत्तसंस्थेनं केलेल्या ट्विटनुसार भारतीय रेल्वे १२ मे पासून पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा विचार करीत आहे. यानुसार टप्प्याटप्प्यानं रेल्वे सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक पातळीवर ३० रिटर्न ट्रेन सुरू होतील. या विशेष ट्रेन म्हणून चालवल्या जातील. नवी दिल्ली, दिलबर्गा, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू या प्रमुख स्थानकांपर्यंत रेल्वे जाणार आहेत.
यासाठी ११ मेपासून सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाइन बुकिंग सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे बुकिंग IRCTC च्या वेबसाइटवर ऑनलाइन करण्यात येईल. तिकीट खिडकी सुरू नसणार असंही सांगितलं जात आहे. याशिवाय प्रोटोकॉल नियमाचे पालन करणं अनिवार्य आहे.
हेही वाचा