Advertisement

मुंबईत कोरोनाचे १३०४ नवे रुग्ण, ५८ जणांचा दिवसभरात मृत्यू

शनिवारी दिवसभरात १४५७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९५ हजार ३५४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाचे १३०४ नवे रुग्ण, ५८ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी कोरोने २७५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शनिवारी दिवसभरात १३०४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी दिवसभरात ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-‘या’ गुन्ह्यात रॅपर बादशाहची पोलिसांनी केली ४ तास चौकशी

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५८ रुग्ण दगावले आहेत. तर ६ आँगस्ट रोजी ५७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ७ आँगस्ट रोजी एकूण ४५ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय शनिवारी मुंबईत कोरोनाचे १३०४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २२ हजार ३३१ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात १४५७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९५ हजार ३५४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अजूनही मुंबई पोलिसांकडेच- गृहमंत्री

राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. आज १२ हजार ८२२ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४७  हजार ४८  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २६ लाख ४७ हजार ०२० नमुन्यांपैकी ५ लाख ०३ हजार ०८४ नमुने पॉझिटिव्ह (१९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८९ हजार ६१२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १२,८२२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २७५ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१३०४ (५८), ठाणे- २३२ (६), ठाणे मनपा-३०४ (१५),नवी मुंबई मनपा-४६६ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३७७ (१२),उल्हासनगर मनपा-४२, भिवंडी निजामपूर मनपा-२२, मीरा भाईंदर मनपा-२२२ (९),पालघर-१५७ (५), वसई-विरार मनपा-२१७ (९), रायगड-२३७ (१३), पनवेल मनपा-१६४ (४), नाशिक-१४७(५), नाशिक मनपा-५८९ (३), मालेगाव मनपा-५४,अहमदनगर-३४२ (२),अहमदनगर मनपा-२६५, धुळे-१३९ (१), धुळे मनपा-२०१ (७), जळगाव-४६३ (२), जळगाव मनपा-१९३, नंदूरबार-१५६, पुणे- ४३७ (८), पुणे मनपा-१४७५ (३९), पिंपरी चिंचवड मनपा-८९० (२०), सोलापूर-३९६ (६), सोलापूर मनपा-४१ (१), सातारा-१८८ (१), कोल्हापूर-३१४ (८), कोल्हापूर मनपा-२०६ (१), सांगली-७५ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७७ (४), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-८ (४), औरंगाबाद-१८७, औरंगाबाद मनपा-१६६ (२), जालना-२०२ (६), हिंगोली-६, परभणी-४८, परभणी मनपा-२७, लातूर-१२१ (१), लातूर मनपा-१०४, उस्मानाबाद-१९६ (१), बीड-१०७ (३), नांदेड-१२२, नांदेड मनपा-१, अकोला-१८, अकोला मनपा-९ (१), अमरावती-३१, अमरावती मनपा-७०, यवतमाळ-९२ (२), बुलढाणा-१०७, वाशिम-४९, नागपूर-१४३ (१), नागपूर मनपा-३७१ (५), वर्धा-२, भंडारा- ३९, गोंदिया-४१, चंद्रपूर-८, चंद्रपूर मनपा-८, गडचिरोली-३४, इतर राज्य १७.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा