Advertisement

मुंबईत कोरोनाचे २२६७ नवे रुग्ण, दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू

तर शुक्रवारी दिवसभरात ९२५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ३७ हजार ६६४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे २२६७ नवे रुग्ण, दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी कोरोने ४०५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात २२६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५३ रुग्ण दगावले आहेत. तर १७ सप्टेंबर रोजी ४३ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १६ सप्टेंबर रोजी एकूण ५० जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २२६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ८० हजार ५४२ इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ९२५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ३७ हजार ६६४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- रेल्वेचा प्रवास होणार महाग, स्टेशनवर युजर फी लागू होऊ शकते

राज्यात आज एका दिवसात २२ हजार ७८ एवढ्या विक्रमी संख्येने  रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आज नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २१ हजार ६५६ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या ३ लाख ८८७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ लाख ९३ हजार ३४५ नमुन्यांपैकी ११ लाख ६७ हजार ४९६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५१ टक्के) आले आहेत. राज्यात  १७ लाख  ७८ हजार ७९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४०५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७२ टक्के एवढा आहे.


आज निदान झालेले २१,६५६ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४०५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२८३ (५२), ठाणे- ४४५ (६), ठाणे मनपा-४३१ (१०), नवी  मुंबई मनपा-२८० (४), कल्याण डोंबिवली मनपा-५५७ (१), उल्हासनगर मनपा-७२ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३९ (१), मीरा भाईंदर मनपा-२०१ (९), पालघर-२१५ (४), वसई-विरार मनपा-२३५ (१), रायगड-४५२ (९), पनवेल मनपा-२४७, नाशिक-२४१ (१०), नाशिक मनपा-५२३ (५), मालेगाव मनपा-२० (१), अहमदनगर-६९८ (१२),अहमदनगर मनपा-२९७ (९), धुळे-३९ (२), धुळे मनपा-४०(१), जळगाव-८३४ (१३), जळगाव मनपा-१३० (३), नंदूरबार-१३३, पुणे- १३५६ (७), पुणे मनपा-१८७५ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-८१० (४), सोलापूर-५८४ (९), सोलापूर मनपा-५३ (३), सातारा-९०२ (३४), कोल्हापूर-६०७ (५), कोल्हापूर मनपा-१९६ (६), सांगली-७८१ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३३१ (४), सिंधुदूर्ग-२०० (६), रत्नागिरी-११५, औरंगाबाद-११७ (५),औरंगाबाद मनपा-१७९ (७), जालना-७३ (१), हिंगोली-४७ (१), परभणी-३३२, परभणी मनपा-२४ (३), लातूर-२२१ (८), लातूर मनपा-९४ (४), उस्मानाबाद-२९५ (२), बीड-१८२ (७), नांदेड-१९० (१), नांदेड मनपा-१३२ (३), अकोला-३७, अकोला मनपा-८३ (१), अमरावती-१२५ (१), अमरावती मनपा-२४६, यवतमाळ-३२० (१०), बुलढाणा-१०७ (१), वाशिम-१०१ (३), नागपूर-४१२ (५), नागपूर मनपा-१६९४ (५९), वर्धा-१२९, भंडारा-९२, गोंदिया-१६६ (४), चंद्रपूर-१५७, चंद्रपूर मनपा-१०१, गडचिरोली-३८, इतर राज्य- ४० (२).

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा