चीनमध्ये कोरोना महामारीने पुन्हा कहर केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. शेजारील देशातील बिघडलेली परिस्थिती पाहून भारत सरकारनेही पावलं उचललायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनही अलर्ट मोडवर आलं आहे. कोविड-19 संदर्भात IMA नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. असोसिएशनने जनतेला आवाहन केले आहे की तात्काळ प्रभावाने प्रत्येकाने कोविड पालन करावे. लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
IMAने जारी केलेले निर्देश
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च (ICMR) चे डॉ. समीरन पांडा यांनी फर्स्टपोस्टला सविस्तर मुलाखत दिली. भारतात भविष्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चीनसारखी झपाट्याने वाढ होईल का असं डॉ. पांडा यांना विचारलं असता, ते म्हणाले की, जे काही चीनमध्ये घडतंय, ते भारतात होईलच असं मानणं चुकीचं ठरेल.
दरम्यान, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोविड १९ च्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणांवर मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा