दहीसर - येथील शांतीनगर परिसरातील झोपडपट्टीवासी घाणीमुळे हैराण झाले आहेत. शैलेंद्रनगर, अकबर मार्केट येथील घाणीचं पाणी आणि कचरा या परिसरात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे हा नाला पूर्णपणे भरला तरी देखील याकडे पालिका प्रशासनाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. याबाबत के उत्तर विभागाचे मनपा आयुक्त विजय कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.