दहिसर - जननी मानव सेवा ट्रस्टतर्फे दर महिन्यात केल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचा कार्यक्रम बुधवारी झाला. केंद्र सरकारनं गोर-गरीबाचं रेशनिंग बंद केल्यानं सामाजिक उपक्रम म्हणून धान्यवाटप करत असल्याचं जननी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष चौथी प्रसाद गुप्ता यांनी सांगितलं. या वेळी दहिसर पोलीस ठाण्यातले उपनिरीक्षक हरीश पोळ, उपनिरीक्षक निलेश नलावडे, शिवानंद शर्मा, रामआश्रय चौहान, मोहम्मद रफी शरीफ, कालिका यादव, उबेद खान, भिमा धोत्रे, जिगर प्रजापति आदी मान्यवरही उपस्थित होते.