शिवाजीनगर - मालाड मढ, शिवाजीनगरच्या मामू गल्लीतील रहिवाशांची कचऱ्यापासून सुटका झाली आहे. कित्येक महिन्यांपासून इथं मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत मढ विभाग 29 चे काँग्रेस अध्यक्ष विक्रम कपूर यांनी आवाज उठवला असता पालिका कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कचरा उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळं या भागात राहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.