Advertisement

राज्यात ४ हजार मतदान केंद्रांची वाढ

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्र वाढली आहेत. सध्या मतदारांची नाव नोंदणी सुरु असल्यानं मतदान केंद्र वाढण्याची शक्यता आहे

राज्यात ४ हजार मतदान केंद्रांची वाढ
SHARES

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्र वाढली आहेत. सध्या मतदारांची नाव नोंदणी सुरु असल्यानं मतदान केंद्र वाढण्याची शक्यता आहे. २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्र होती. तर २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्र स्थापन करण्यात आली.


९५ हजारांवर मतदान केंद्र

२०१४ मध्ये एकूण ९१ हजार ३२९ मतदार केंद्र स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये ९५ हजार ४७३ मतदान केंद्रं स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात ५५ हजार ८१४ तर शहरी भागात ३९ हजार ६५९ मतदान केंद्र असतील. मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मूलभूत सुविधा मिळणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान ८ प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजीदेखील घेण्यात येणार आहे.




हेही वाचा -

लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; मुंबईतून शेवाळे, किर्तीकर आणि अरविंद सावंत

सुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी





Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा