कोरोना विषाणूचा (coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १५ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपासून १ जून २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याबाबतचे शासनाचे आदेश गुरूवारी जारी करण्यात आले आहेत. लाॅकडाऊनला मुदतवाढ देतानाच निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १ मे पर्यंत असलेल्या या निर्बंधांना १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत शनिवारी संपत असल्याने बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाॅकडाऊनवर चर्चा करण्यात आली.
कडक निर्बंधामुळे राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात आली असली तरी अजूनही काही जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सध्याचे निर्बंध आणखी १५ दिवस वाढविण्याची मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. हा निर्णय मुख्यमंत्रीच जाहीर करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली होती. त्यानुसार लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा- मुंबईत 'म्युकरमायकोसिस'चे १११ रुग्ण आढळले
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार राज्याबाहेरुन महाराष्ट्रात (maharashtra) येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीआसीरआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ही चाचणी महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ४८ तास आधी केलेली असावी तसंच ती निगेटिव्ह असावी असं आदेशात नमूद आहे.🚨Strict restrictions under #BreakTheChain extended till 1st June 2021🚨 pic.twitter.com/QxEmW77ZlV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 13, 2021