राज्य सरकार कामाचे तास वाढविण्याच्या योजनेवर काम करीत असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामगार विभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून महाराष्ट्रात दिवसाचे कामाचे तास 9 वरुन 10 तासांवर करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या ease of doing business च्या धोरणाअंतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील हे बदल उद्योग आणि कामगार या दोन्ही घटकांसाठी महत्त्वाचे असून उद्योग क्षेत्राला अधिक लवचिकता आणि कामगारांसाठीही पारदर्शक आणि नियोजित कामकाजासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
कलम 65 मध्ये कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा 115 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे.
तसेच शासन मान्यतेशिवाय असा वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही. त्याचबरोबर, आठवड्यात 48 तास काम ही कालमर्यादा ओलांडता येणार नसल्याचेही कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले आहे. कामगारांकडून जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्ट्या देण्यासंबंधीचे बदल यात सुचविण्यात आल्याचं फुंडकर यांनी सांगितलं.
हेही वाचा