राज्य शासनाकडून महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सर्व अधिवास प्रमाणपत्र आणि शिधापत्रिका धारक नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे. थोडक्यात केशरी आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांपुरता सीमित असणारी ही योजना आता सरसकट इतरही नागरिकांना लागू होणार आहे.
राज्यशासनानं बुधवारी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत या योजनेचं केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेशी एकत्रीकरण करत आरोग्य कवच दीड लाखांवरून थेट पाच लाख रुपये कण्याचं ठरवलं. परिणामी राज्यातील प्रत्येत कुटुंब म्हणजेच साधारण 12 कोटी नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 इतक्या उपचारांचा समावेश आहे. परिणामी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या एकत्र येण्यानं दोन्ही योजनांमध्ये असणाऱ्या सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
योजना कसं काम करणार?
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कशी कराल नोंदणी, काय आहे पात्रता?
या योजनेसाठी काही प्राथमिक कागदपत्रांची पूर्तता केली जाणं महत्त्वाचं. त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, सरकारी डॉक्टरांकडून मिळालेलं आजाराचं प्रमाणपत्र, वयाचं प्रमाणपत्र, अर्जदाराचे पासपोर्टसाईज 3 फोटो, उत्पन्नाचा दाखला यांचा समावेश आहे.
हेही वाचा