Advertisement

मुंबईत १८.२ अंश तापमानाची नोंद; गारठा वाढला

मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली असून, मुंबईचं किमान तापमान गुरुवारी १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं आहे.

मुंबईत १८.२ अंश तापमानाची नोंद; गारठा वाढला
SHARES

मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली असून, मुंबईचं किमान तापमान गुरुवारी १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं हवामानात बदल झाले होते. त्यामुळं मुंबई आणि राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली होती. आठवडाभर किमान तापमान खाली घसरण्याचा ट्रेंड कायम राहील, अशी शक्यता देखील हवामान खात्यानं वर्तविली आहे.

जळगाव, पुणे, नाशिक, महाबळेश्वर, डहाणू, गोंदिया या शहरांच्या किमान तापमानात चांगली घसरण झाली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मिनी विंटर अनुभवास येत आहे. येथे किमान तापमानात घट झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. २० जानेवारीपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीची मध्यम लाट येईल, अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तविली होती. त्यानुसार किमान तापमानात घट होत आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणात थंडीचा प्रभाव राहील. २२ आणि २३ जानेवारी नंतर पुणे, नाशिक येथील पारा १२ अंशा खाली जाईल. मुंबई आणि परिसरात देखील किमान तापमानात घट होईल. किमान तापमान १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण वाढले होतं. शिवाय किमान आणि कमाल तापमानात देखील वाढ झाली होती.

सरासरी तापमान ४ अंशांनी वाढले होते. शिवाय आकाश मोकळे होते. परिणामी नागरिकांना उन्हाचे चटके बसत होते. आणि दिवसासह रात्री देखील किंचित उकाडा जाणवत होता. मात्र आता किमान तापमानात घट झाल्याने हे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा